Sunday, 27 October 2013

आशिर्वादाची शिदोरी

माझ्या मोठ्या ताईचं लग्न झालं तेव्हा मी लहानच होतो , कधी समजलेच नाही कि लग्नं झाल्यावर सासरी जाताना मुलगी इतकी का रडत असते....पण आज त्याचं कारणही समजले अन तेच मी माझ्या शब्दात सांगू इच्छितो....

                                                 "आपल्यांपासून दूर जाताना खूप त्रास होतो"
अखंड चाललेल्या प्रवासाला अचानक थांबा मिळतो ,
मधूनच एखादी नवी वाट गवसते....
मनालासुद्धा त्या वाटेवरती चालावेसे वाटते.
वाटेवरून चालताना जोडीदाराची गरज लागते
जोडीदाराच्या विश्वासाने आयुष्य मार्गी लागते....
आयुष्याची गाडी तुफान वेगाने धावत सुटते....
आयुष्य जगताना आशिर्वादाची शिदोरी लागते."

ओल्या डोळ्यांनी मुलगी म्हणते ,
आई ! आता मी सासरी जाते ....

No comments: