Friday, 4 October 2013

असा एक शेवट

असा एक शेवट 
(Think & then behave in front of your next Generation)

आपण नेहमी ऐकत असतो कि मुलं त्यांच्या आई वडिलांचं ऐकत नाही वैगरे...पण ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे कि मुलं ही कोणाचं ऐकत नसतात ते फक्त अनुकरण  करत असतात ते ही आपलंच होय ना !जर मुलं बिघडली तरी आणि मुलं सुधारली तरी त्याचा दोष आणि त्याच श्रेय हे आपल्यालाच मिळणार कारण त्याला घडवणारे आणि बिघडवणारे आपणच ना ! 

चला एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला , एक कुटुंब होतं अगदी ३-४ माणसाचं खूप नावाजलेलं ,
कुटुंबात एक जोडपं , एक त्यांचा लहान मुलगा अन एक वयस्कर आजोबा राहत होते. 
त्या आजोबांनी त्यांच्या मुलाच खूप थाटामाटात लग्न लावून दिला होतं. दिवस सरत होते अन सुनबाई चा स्वभाव हळू हळू बदलत होता आता ती पहिल्यासारख सासऱ्याबरोबर काही नीट वागत नव्हती.बिचारा सासरा काही न बोलता सर्व काही निमूटपणे सहन करत होता.एके दिवशी त्या सुनेने तिच्या 
नवऱ्याकडे तक्रार केली कि हा म्हातारा आपल्यात असल्यामुळे आपल्याला काही बोलता येत नाही , मनासारखं वागता येत नाही, 
सून : मामन्जीला माडीवर द्या घालवून नवरा : नको नको ते माझे वडील आहेत , मी नाही  माडीवर घालवणार त्यांना !
सून : का ? तुम्ही सांगा तुमचं प्रेम कोणावर आहे तुमच्या वडिलांवर कि माझ्यावर ?
नवरा आता हतबल झाला होता ....
नाईलाजाने त्याने स्वतःच्या वडिलांना वरच्या खोलीत घालवून दिले अन हातात एक घंटी देऊन सांगितले कि काही लागले कि घंटी वाजवा मी देयेल तुम्हाला काय हव नको ते ...
बिचारा "आलीय बोगासी ते भोगिलेच पाहिजे" प्रमाणे हातात घंटी घेऊन अन डोळ्यात पाणी आणून स्व:ताच्या मुलाकडे अन त्याच्या दीनवाण्या अवस्थेकडे पाहत हसत राहिला रडत राहिला.

आता आजोबा थकले काही बोलता येत नवतं अन चालता ही येत नवतं
एके दिवशी त्या आजोबाचा नातू खेळता खेळता आजोबांच्या खोली गेला अन त्यांची घंटी बरोबर घेवून बाहेर आला आता त्या आजोबाचा घंटी रुपी आवाज ही बंद झाला होता ....बिना अन्न पाण्याचं मरण त्या आजोबाच्या नशिबी आलं त्याला कारण त्यांचा मुलगा , सून , नातू अन त्यांची घंटी होय ना !!
मरणा नंतर सर्व विधी उरकल्या नंतर एके दिवशी त्या आजोबांच्या मुलाने स्वतःच्या मुलाला घंटी बरोबर खेळताना पाहिलं तेव्हा त्यांनी सहज त्याला विचारलं ,
वडील (आजोबांचा मुलगा) : काय रे पिंट्या ही घंटी तू का खाली आणलीस ?
मुलगा (आजोबांचा नातू)  : वर तरी कशाला ठेवायची आता आजोबा पण नाही ना ?
वडील : अरे पण ती त्यांची आठवण आहे ना ?
मुलगा : म्हणून काय झालं आता आजोबा नाहीत मग त्या घंटीला  अडगळीत का ठेऊ ?जर यदा     कदाचित माझं ही लग्न झाल्यावर ही घंटा तुमाला कामाला येईल कि आजोबांसारखी.
 बिचारे वडील मुलाच्या त्या नकळत बोलून गेलेल्या शब्दरुपी तलवारीने इतके घायाळ झाले कि जीवन असूनही ते क्षण क्षण  मरण यातना भोगत होते कारण त्यांनी न काळात का होईना पण आपल्या मुलासमोर चुकीचा संदेश ठेवला होता  

            चला विचार करू या !! आपल्याला कोणता संदेश द्यायचा आहे आपल्या पुढच्या पिढीला ?
Think and then behave in front of your next generation 
: गोकुळ गायखे 

No comments: