शुभेच्या तर प्रत्येकजण देत असतो
मनाच्या गाभाऱ्यातून जो आवाज येतो तो तर जगावेगळा असतो
शब्दातूनही व्यक्त होऊ शकत नाही परंतु व्यक्त केल्याविना राहू शकत नाही
"शांत निवांत शिशिर सरला .
सळसळता हिरवा वसंत आला .
कोकिळेच्या सुरवाती सोबत , चैत्र ”पाडवा ” दरी आला "
गुढी किंवा ब्रह्मध्वज ही आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे.
गुढी उंचबांबूपासून तयार केली जाते. बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुलिंब, फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर धातूचे भांडे, सहसा तांब्या बसविला जातो.
गुढी नंतर पाटावर उभी केली जाते.
"ब्रह्माने विश्व निर्मिती या दिवशी केली.विजयी श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा वध करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला. शालीवाहन नावाच्या कुंभाराच्या शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण निर्माण करून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला ह्या शुभ गोष्टी याच दिवशी घडल्या म्हणून घरोघरी वर्षप्रतिपदेच्या दिवशी वेळूची काठी स्वच्छ धुवून, तिला तांबडे वस्त्र नेसवून, फुलांची माळ व साखरेची गाठी बांधतात. टोकावर चांदीचे किंवा तांब्याचे फुलपात्र पालथे ठेवतात. मग अशीच सजवलेली गुढी घराच्या दाराशी उंच गच्चीवर लावून आनंद साजरा करतात. या पाडव्याच्या शुभदिनी नव्या वर्षात सहकार्य करण्याचा संकल्प करावा व शुभेच्छा व्यक्त कराव्यात.शालिवाहन राजाच्या नावाने नविन कालगणना शालिवाहन शक चालू केले."
“नूतन वर्षाभिनंदन"



No comments:
Post a Comment