Friday 4 October 2013

आपल्या कृपेने !!

आपल्या कृपेने
मित्रांनो मला आवडलेला महाराजांवरील लेख :- 

छत्रपती शिवाजी महाराज
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक

निश्र्चयाचा महामेरूबहुतजनांसी आधारूअखंडस्थितीचा निर्धारू,श्रीमंत योगी ।।
नरपतीहयपतीगजपती। गडपतीभूपतीजळपती।
पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।।
यशवंतकीर्तीवंतसामर्थ्यवंत।
वरदवंतपुण्यवंतनीतीवंत। जाणता राजा ।।
आचरशीलविचारशीलदानशील।
धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।।
धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर 
सावधपणे नृपवर तुच्छ केले।।
देवधर्म गोब्राह्मणकरावया संरक्षण।।
हृदयस्थ झाला नारायणप्रेरणा केली
या भूमंडळाचे ठाईधर्मरक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काहीतुम्हा कारणी।।
कित्येक दृष्ट संहारली। कित्येकासी धाक सुटला 
कित्येकाला आश्रयो जाहला 
शिवकल्याण राजा। शिवकल्याण राजा।।शिवकल्याण राजा।।।
शिवकाळात स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे समर्थरामदास यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजयांचे महानतम  युगप्रवर्तक असे व्यक्तिमत्त्व उपरोक्त परिपूर्ण,आशयघन  वजनदार अशा शब्दांत तोलले आहेछत्रपतींच्याव्यक्तिमत्त्वाच्या  कार्यकर्तृत्वाच्या प्रत्येक पैलुचा उल्लेख या कवनातकेलेला आहे.

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचंत्या काळी ५पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं तेछत्रपती शिवाजी महाराजांनी.  सुमारे ३०० वर्षे महाराष्ट्र पारतंत्र्यात,गुलामगिरीत खितपत पडला होतादिल्लीचे मुघलआदिलशाह,निजामशाहकुतुबशाह यांच्या अत्याचाराने इथली गरीब जनता भरडलीजात होतीसाम्राज्यवादाने झपाटलेल्या सुलतानी आक्रमणांमुळे इथलीघरे-दारेपीक-पाणीबायका-पोरी सुरक्षित नव्हत्यायाच काळातशहाजीराजे भोसले  जिजामाता यांच्या पोटी छत्रपती शिवाजीमहाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९फेब्रुवारी१६३० रोजी, (संदर्भ : श्री राजा शिवछत्रपतीगजानन मेहेंदळे,डायमंड पब्लिकेशन्सपुणे जिल्ह्यातीलजुन्नर तालुक्यातील शिवनेरीगडावर झालावडिलांचा जाहगिरीचा प्रदेश बंगळूरचा (कर्नाटक)असल्यामुळे शिवबांची जडण-घडण त्यांच्या आई जिजाबाईंच्यासहवासात  त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झालीरामायणमहाभारत यागोष्टींचे शिवबांवर लहानपणापासून संस्कार झालेया गोष्टींच्याचमाध्यमातून त्यांची स्वराज्य प्रेरणा जिजाबाईंनी जागृत केली.राज्यशास्त्रधर्मशास्त्र यांचा अभ्यास त्यांनी लहानपणीपासून मोठ्याकुशलतेने केलात्याचबरोबर लाठीकाठीतलवारबाजीदांडपट्टा,घोडेस्वारी याबाबतीतही शिवबा पारंगत झाले



मुरार जगदेवाने पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवल्यानंतर त्याजाहगिरीचा ताबा जिजाबाईंनी घेतलाजिजाबाईंनी त्याच ठिकाणीसोन्याचा नांगर  फिरवूनलोकांना एकत्र करून पुन्हा पुणे हे गाववसवलंयाच काळात जाहगिरीच्या कारभाराच्या निमित्ताने शिवाजीराजांचा संबंध इथल्या १२ मावळांमध्ये आलाया ठिकाणीच त्यांनाप्रथम बालमित्र  नंतर स्वराज्याचे शिलेदार मिळालेया काळातचत्यांचे नेतृत्वगुणही फुलायला लागले.  एका स्त्रीवर अत्याचार करणार्याएका गावाच्या पाटलाला त्यांनी हात-पाय तोडण्याची शिक्षा याच काळातसुनावलीआपल्या दक्ष न्यायव्यवस्थेचे उदाहरण रयतेसमोर ठेवले वस्वराज्याच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारण्यास ते समर्थअसल्याचेही सिद्ध केलेवयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी रायरेश्र्वराच्यापठारावर शिवलिंगाला स्वत:च्या रक्ताचा अभिषेक करूनस्वराज्यस्थापनेची  शपथ घेतलीया वेळी सोबत त्यांचे जिवाभावाचेसवंगडी-मावळे होतेचतोरणा जिंकून त्यांनी जणू स्वराज्य स्थापनेचेतोरणच बांधलेतोरण्यानंतर पुरंदर काबीज करणेफत्तेखानाबरोबरचीलढाई यामुळे शिवरायांचा आत्मविश्र्वास  निर्धार या दोन्ही गोष्टी वाढतगेल्यापण त्यांची खरी परीक्षा झाली ती शहाजीराजांना कैद झाली त्यावेळीशत्रूचा शत्रू तो आपला मित्र या सूत्राचा उपयोग करूनदिल्लीच्याबादशाहकरवी आदिलशाहवर दबाव आणून त्यांनी आपल्या मुत्सद्दीराजकारणाचे दर्शन घडवले.
त्यानंतरच्या काळात अफझलखानाच्या रूपाने महाराष्ट्रावर खूप मोठेसंकट आलेहजारो गावे खानाच्या सैन्याने जाळलीहजारो मंदिरं नष्टकेली आणि रयतेवरही खूप अन्याय केलेपण महाराजांनी  घाबरतानडगमगता त्याचा सामना करण्याचे ठरवलेस्वराज्याचे आपण पालकआहोत ही भावना प्रबळ होत गेलीत्यातच कान्होजी जेधे  इतर अनेकसरदारांनी केलेला त्याग  पराक्रम यातून कृतज्ञतेची आणिजबाबदारीची भावना प्रबळ होत गेलीप्रतापगडाच्या पायथ्याशीशिवरायांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून इतिहासात नवाअध्याय लिहिला. ‘अफझलखान चाल करून आलात्याला महाराजांनीशिताफीने प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीला बोलावले आणि धाडसानेखानाला संपवले.’ - या वाक्यांमध्ये महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा,अभ्यासकांना आश्र्चर्य वाटेल असा आणि आजही मार्गदर्शक ठरेल असामोठा इतिहास सामावलेला आहेखानाला भेटतानाचा गणवेशखानाचादेह (उंचीजाडी), स्वत:ची उंची, `काय झाल्यास काय करायचेयाच्यापर्यायांचा अभ्याससोबतीच्या माणसांची निवडखानाचा खात्माकेल्यानंतर त्याच्या सैन्याचा पराभव करण्यासाठीचे नियोजन,त्यासाठीचा गनिमी कावामोहीम अयशस्वी झाली अन्‌ खुद्द शिवरायांनादगाफटका झाला तर पुढे काय करायचे याचे पूर्ण नियोजन - या सर्वघटकांचा तपशीलवार विचार महाराजांनी त्या प्रसंगी करून ठेवला होता.शाहिस्तेखानाची पुण्यात लाल महालात कापलेली बोटेपुढील काळातआग्र्याहून केलेली सुटका हे सुप्रसिद्ध ऐतिहासिक प्रसंगही छत्रपतीशिवरायांच्या गुणांची साक्ष देतात.
स्वराज्याची सीमा दक्षिणेत तुंगभद्रेपर्यंत तर उत्तरेत सातपुड्यापर्यंतत्यांनी नेली होतीलढाईच्या काळात त्यांनी कधी रयतेला त्रास दिलानाहीकी मराठी सैन्याने कुणाच्या स्त्रियांवर अत्याचार केला नाही.स्वत:च्या सैन्यासमोर त्यांनी आदर्श ध्येयवादनीतिमूल्ये वस्वराज्यनिष्ठा ठेवल्यामुळे मराठी सैन्यामध्ये सदैव आवेगआवेशआणि उत्साहाचे वातावरण असायचे!
स्वराज्यनिष्ठा  पराक्रम यांसह सैन्य उभे करणेविविध आक्रमणांनातोंड देणेलढाया यशस्वी करत गडकोट काबीज करणे हे करतअसतानाचदुसर्या बाजूला शिवरायांची प्रशासनात्मक  रचनात्मककामेही चालूच असतशिवाजीराजांनी एक आदर्श शासनव्यवस्था उभीकेलीसैन्याचा पगार केंद्रीय पद्धतीने देणेसरदारांच्या बदल्या करणे,शेती  शेतसार्याबद्दल यंत्रणा लावणेभूक्षेत्रानूसार शेतसारा निश्र्चितकरणेनैसर्गिक आपत्तींच्या काळात प्रसंगी शेतसारा माफ करणे अशाअनेक महत्त्वाच्या व्यवस्था त्या काळात सुरू झाल्या महिनेस्वराज्याच्या सैन्यात नोकरी   महिने शेती करणे ही शिलेदारीव्यवस्था सुरू करून महाराजांनी प्रजेला  वेळची भाकरी मिळवण्याचीआणि देशसेवा करण्याची संधी एकत्रितपणे दिलीत्यामुळे प्रजेलाआर्थिक  सामाजिक सुरक्षितता प्राप्त झालीतसेच स्वराज्याबद्दलचीप्रजेची निष्ठा अधिकाधिक घट्ट होत गेली.
सूर्याजी काकडेवाघोजी तुपेबाजी पासलकरमुरारबाजी देशपांडे,बाजीप्रभू देशपांडेतानाजी मालुसरेप्रतापराव गुजरनेताजी पालकर,बहिर्जी नाईक, ... यांसारख्या हजारो मावळ्यांनी स्वत:च्या प्राणाची बाजीलावून स्वराज्याचे स्वप्न साकार केलेत्यामागे फार मोठा ध्येयवादहोताराष्ट्रवाद होताआधुनिक शस्त्रास्त्रेवेगवान घोडदळाचा विकास वकोकण किनारपट्टीकडून अरबहपशीसिद्धीपोर्तुगीज यांपासूनसंरक्षण करण्यासाठी केलेली आरमाराची स्थापना या महत्त्वाच्याघटकांचेही त्यामध्ये योगदान होते.  शत्रूचे मर्म आणि मर्यादा ओळखूनत्यावर अचानकपणे हल्ला करूनवार्याच्या वेगाने चाल करून शत्रूचीदाणादाण उडवून देण्याच्या अनोख्या तंत्रामुळे त्यांनी दिलेरखान,शाहिस्तेखानअफझलखान  इतर अनेक सरदारांची पळताभुई थोडीकेली .स्वराज्यावर चालून आलेल्या प्रत्येक आक्रमणापासून त्यांनीप्रजेचे रक्षण केले.
जगद्गुरू संत तुकारामसमर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराजही तीन अलौकिक व्यक्तिमत्त्वे एकाच काळात महाराष्ट्रात वास्तव्यासहोतीमहाराष्ट्राचा तो सुवर्णकाळचसंत तुकाराम  छत्रपती शिवराययांच्या भेटीचे उल्लेख इतिहासात आढळतात. (काही अभ्यासक यादोहोंची भेट १६४७ साली झाल्याचे सांगताततर काही अभ्यासक १६४९मध्ये ही भेट झाल्याचा अंदाज व्यक्त करतात.) संत तुकारामांचे कीर्तनऐकून मूळातच सत्प्रवृत्तीचे  आध्यात्मिक वृत्तीचे असणारे छत्रपतीयांच्या मनात विरक्तीचे विचार प्रबळ झालेपण संत तुकोबारायांनीछत्रपतींना `आम्ही जगाला उपदेश करावा। आपण क्षात्रधर्म सांभाळावा'असा उपदेश केलाशिवरायांनी या आज्ञेचे पुढील काळात तंतोतंत पालनकेले.
स्वराज्य खूप मोठे झाले होतेअशा वेळेसच छत्रपती शिवाजीमहाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्र धर्माच्या पुनरुत्थानाचे बीजचठरले१६७४ सालच्या ज्येष्ठ महिन्यामध्ये त्यांचा राज्याभिषेककाशीच्या गागाभट्टांकडून  झालामहाराज छत्रपती झालेहामहाराष्ट्राच्या  भारताच्याही इतिहासातील एक सर्वोच्च पराक्रमाचा,आनंदाचा  अभिमानाचा क्षण होय!

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgZVwxxV7YkkwwRuOpOYvngaEYf2dl0blr7jTpV8KKU2jnQsEx2X2HZDol30NQQsYI6GXHvifMQ6KapcKFZ3jPusRDqjziShGT3O8mC3oCooxKVIERcOoUharjhXGjF2DZlL0xOShsxvk4D/s400/Janata+Raja+4.jpg

छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचा  कारकीर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलाअसता काही गोष्टी समोर येतात
शौर्यपराक्रमशारीरिक सक्षमताध्येयवादकुशल संघटन,कडक  नियोजनबद्ध प्रशासनमुत्सद्दीपणाधाडसद्रष्टेपणा...असे उच्च कोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटलेलेदिसतात.
छत्रपती शिवाजी महाराजांनी
-   बालपणीतरुणपणी शारीरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी स्वत:कष्ट घेतले
-   पराक्रमासाठी शस्त्रांचा अभ्यास केला
-   साध्या -भोळ्या मावळ्यांचे संघटन करून त्यांच्यामध्ये निष्ठा वध्येयवाद जागृत केला
-   स्वतशपथ घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यातस्वत:ला घट्टपणे बांधून घेतले;
-   महत्त्वाचे गड-किल्ले जिंकलेनवे निर्माण केले
-   योग्य त्या वेळी आक्रमण किंवा गरज पडेल त्या वेळी तह हे सूत्रकमालीच्या हुशारीने वापरून अनेक शत्रूंना नामोहरम केलेच,तसेच फितुरीदगाबाजीस्वराज्यांतर्गत  कलहाचाही सामनाकेला
-   आक्रमणाच्या वेळी गनिमी कावा तंत्राचा चातुर्याने वापर केला;
-   सामान्य रयतेची व्यवस्थाशेतकर्यांची व्यवस्थालढवय्याशूर सरदारांची व्यवस्थाधार्मिक स्थानांची व्यवस्था... अशाअनेक व्यवस्था लावून दिल्या
-   सर्वांत महत्त्वाचे म्हणजे छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाचीस्थापना करून हिंदवी स्वराज्याच्या राज्यकारभाराची परिपूर्णव्यवस्था निर्माण केली
-   राजभाषा (मराठीविकसित करण्याचा गांभीर्यपूर्वक प्रयत्नकेलाविविध कलांना राजाश्रय दिला
-   तसेच खचलेल्यापिचलेल्या रयतेच्या मनामध्येस्वाभिमानाचापराक्रमाचास्वराज्य निष्ठेचा हुंकार जागृत केला
या सर्व गोष्टी त्यांनी साध्य केल्या अवघ्या ५० वर्षांच्याआयुष्यात

सतराव्या शतकात जागृत झालेला तो स्वाभिमानतीस्वराज्यनिष्ठा आजही महाराष्ट्राला प्रेरणा देतेमहाराष्ट्र धर्मवाढवण्याची स्फूर्ती देते
    


छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय करून आलेयाच काळातत्यांच्या तब्बेतीवरही फार परिणाम झालासततच्या मोहिमादगदगयामुळेच त्यांना ज्वराचा त्रास वाढतच गेलायातच दि०३ एप्रिल१६८०रोजी त्यांचा मृत्यू झालाएका विशाल पर्वाचा अंत झाला.
   
मानवी देहाच्या मर्यादेत राहून शारीरिक शक्तीमानसिक शक्ती आणिइच्छाशक्ती यांच्या क्षमतेच्या योग्य वापराची अंतिम मर्यादा गाठून शौर्य,शीलनीतीमत्तादूरदृष्टीधाडसप्रसंगावधान यासारख्या अनेकसद्गुणांचा सर्वकालीन श्रेष्ठ आदर्श निर्माण करणारे शिवराय हे मनुष्याच्याअंगभूत शक्ती जाग्या होऊन योग्य कार्यात वापरल्या गेल्या तर कायचमत्कार घडतो याचे मूर्तिमंत उदाहरण आहेअलौकिक यश कसेमिळवावे हे शिकविणारा हा महाराष्ट्राचा देव महाराष्टीय लोकांच्या मनातअढळ आणि अमर झाला आहे.
   
शिवचरित्र हे महाराजांच्या मृत्यूपर्यंत थांबत नाहीपुढच्या काळाततब्बल ३० वर्षे या महाराष्ट्राला स्थिर  एकमेव असे नेतृत्व नसतानाही,स्वतऔरंगजेब महाराष्ट्रात आला असतानाही हे स्वराज्य समर्थपणेत्याच्याशी लढले  मुघल सम्राटाला इथेचयाच भूमीत प्राण ठेवावेलागले.
   
शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी समृद्धसंपन्न असेआंनदवनभुवन’  निर्माण केले होतेत्या आनंदवनभुवनाचे वर्णनसमर्थ रामदासांनी पुढील शब्दात केले आहेहे काव्य म्हणजेचछत्रपतींनी पार पाडलेले ‘इतिकर्तव्य’ होय

स्वर्गीची लोटली जेथेरामगंगा महानदीतीर्थासी तुळणा नाही।
आनंदवनभुवनी।।
त्रैलोक्य चालील्या फौजासौख्य बंध विमोचनेमोहीम मांडिलीमोठी।
आनंदवनभुवनी।।
येथून वाढला धर्मु रमाधर्म समागमे , संतोष मांडला मोठा।
आनंदवनभुवनी।।
भक्तांसी रक्षिले मागे आताही रक्षिते पहाभक्तासी दिधले सर्वे।
आनंदवनभुवनी।।
येथूनी वाचती सर्वे ते ते सर्वत्र देखतीसामर्थ्य काय बोलावे।
आनंदवनभुवनी    ।।
उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावयाजप-तप अनुष्ठाने
आनंदवनभुवनी।।
बुडाली सर्वही पापेहिंदुस्थान बळावलेअभक्तांचा क्षयो झाला।
आनंदवनभुवनी।।
आनंदवनभुवनी।।आनंदवनभुवनी।।आनंदवनभुवनी।।


" राजे आज आम्ही मराठे जिवंत आहोत ते आपल्या कृपेने 

No comments: